Close Visit Mhshetkari

राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार ; या तारखेपासून येणार थंडीची लाट.Cold Wave in Maharashtra

मुंबई  : Cold Wave in Maharashtra  राज्यात पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे.

राज्यातील काही ग्रामीण भागांमध्ये किमान तापमान 6 ते 7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याची नोंद आहे. विशेषतः सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे, बीड, जालना आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये  19 डिसेंबर पासुन जास्तीचा थंडीचा जोर  वाढणार आहे. रात्री व पहाटेच्या वेळेत थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागेल. Cold Wave in Maharashtra

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. थंड वाऱ्यांचा वेग वाढल्याने किमान तापमान आणखी घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  जुलैमध्ये महागाई भत्ता वाढणार? कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA होणार ५८% पर्यंत! DA Update News. 

दरम्यान, कोकण आणि मुंबई परिसरातही तापमानात थोडी घट झाली असून सकाळी आणि रात्री थंडावा जाणवत आहे. पुढील काही दिवस राज्यातील नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. Cold Wave in Maharashtra

Leave a Comment