प्रहार संघटनेचा इशारा: १५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘चक्काजाम आंदोलन’. Chakkajam Aandolan Maharashtra
मुंबई | १३ जून २०२५:
Chakkajam Aandolan Maharashtra : नमस्कार मित्रानो शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या अन्नत्याग आंदोलनाने आता तीव्र रूप धारण केले आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे – “१५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम होईल!”
Read more…. आता इतका असेल तुमचा सिबिल स्कोर तर तुम्हाला कर्ज स्वस्त मिळणार
📌 काय आहेत प्रमुख मागण्या?
बच्चू कडू यांनी सरकारकडे शेतकऱ्यांच्या संदर्भातील १६ मुख्य मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: Chakkajam Aandolan Maharashtra
- शेतकऱ्यांना कर्जमाफी.
- उत्पादन खर्चाच्या किमान ५०% नफा जोडून हमीभाव देणे.
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे.
- ऊस उत्पादकांना एफआरपी एकरकमी देणे.
- अति पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई
🔥 आंदोलनाला मिळतोय मोठा पाठिंबा. Chakkajam Aandolan Maharashtra
Read more…… सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय: “आई-वडिलांची काळजी न घेतल्यास संपत्तीवर मुलांचा हक्क नाही
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यातील अनेक शेतकरी नेत्यांचा आणि संघटनांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देणारे काही प्रमुख नेते:
- शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
- राकेश टिकैत (भारतीय किसान युनियन)
- मनोज जरांगे पाटील (मराठा आरक्षण आंदोलन)
- महादेव जानकर, राजू शेट्टी, रोहित पवार, लक्ष्मण हाके, रविकांत तुपकर आदी
📍 १५ जूनला महाराष्ट्र ठप्प? Chakkajam Aandolan Maharashtra
बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे की, “राज्य सरकारने जर लवकरात लवकर मागण्या मान्य केल्या नाहीत, तर १५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम करण्यात येईल.”
या आंदोलनात शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, एसटी सेवा आणि खासगी वाहने यांचा समावेश असेल. नागरिकांना देखील या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📸 आंदोलनाचे दृश्यमान परिणाम.
- अमरावतीमध्ये आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमिनीवर उकिरडून आंदोलन केले.
- काही कार्यकर्त्यांनी स्वतःला थेट जमिनीत गाडले.
- शेकडो कार्यकर्त्यांचे अन्नत्याग उपोषण सुरू
🏛️ सरकारची भूमिका अजूनही अस्पष्ट.
सरकारने अद्याप या आंदोलनावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि कृषी विभागाने यावर मौन बाळगले आहे.