रेपो दर ५.५०% वर कायम, गृह व वाहन कर्जदारांसाठी मोठा निर्णय. RBI MPC Baithak
RBI MPC Baithak : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (MPC) ताज्या बैठकीत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. रेपो दरात कोणताही बदल न करता तो ५.५०% वर कायम ठेवण्यात आला आहे.
यापूर्वी झालेल्या बैठकीत रेपो दरात ०.५०% कपात करण्यात आली होती. मात्र, आता हा दर तसाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जांच्या हप्त्यांमध्ये तातडीने कोणताही बदल होणार नाही.
रेपो दर काय आहे? RBI MPC Baithak
- रेपो दर म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेण्यासाठी द्यावा लागणारा व्याजदर.
- रेपो दर कमी झाला तर बँकांना कमी व्याजाने निधी मिळतो, त्यामुळे ग्राहकांना कर्ज स्वस्तात मिळते आणि बाजारातील खर्च वाढतो.
- रेपो दर वाढल्यास कर्ज महाग होते, खर्च कमी होतो आणि महागाईवर नियंत्रण मिळते.
तज्ज्ञांच्या मते, सध्या महागाई आणि आर्थिक वाढ यांच्यात समतोल राखण्यासाठी रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. पुढील MPC बैठकीत अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून दर बदल होण्याची शक्यता आहे. RBI MPC Baithak